समता परिषद चंद्रपूरच्या वतीने जिल्हा कचेरीवर धरणे

44

मूल :ओबीसी समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर च्या वतीने दिनांक 22 जून ला दुपारी बारा वाजता जिल्हा कचेरी समोर भव्य धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. यावेळी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे तसेच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे ,नॉन क्रिमीलेअर अट रद्द करण्यात यावी,ओबीसी विद्यार्थ्यांना 100 टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी,शेतकऱ्यांना कृषी अवजारे व बियाणे मोफत देण्यात यावी. याकरिता केंद्र शासनाने पुढाकार घेऊन ओबीसींना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी याप्रसंगी समता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, समता परिषदेचे कार्यकर्ते व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.