वीज पडून महिला व पुरूष ठार, दोन जखमी घटनेची माहिती मिळताच मुलचे तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी हजर

45

मूल  :- तालुक्यातील बोंडाळा या गावातील दुपारी अडीच वाजता चे सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसापासून आपला बचाव करण्याच्या हेतूने शेतातील काम ओटापून झाडांमध्ये थांबलेल्या चार जणांपैकी दोघांवर काळाने झडप घातली. आकाशातून मोठयाने आवाज झाला व क्षणार्धात या चौघांवर वीज कोसळली. चौघांपैकी महिला व पुरूष हे दोघे ठार झाले असून दुसरे दोघे महिला व पुरूष गंभीर जखमी आहेत.

जखमी असणा—या पुरूषाची पत्नी या दुर्घटनेत मृत पावली आहे.
तर जखमी असलेल्या महिलेचा पती या घटनेत स्वर्गवासी झाला आहे. ही दुर्देवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत दोन बकरी यांचाही मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये विलास केशव नागापुरे वय 50 वर्षे,
गयाबाई नामदेव पोरटे वय 55 वर्षे राहणार बोंडाळा,तह.मूल जिल्हा चंद्रपूर यांचा समावेश असून ताराबाई विलास नागापूरे वय 45 वर्षे ,नामदवे तानु पोरटे हे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय मुल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच मुलचे तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी,नायब तहसिलदार पवार साहेब,
साजा चे तलाठी श्री मेश्राम व बेंबाळ पोलीस चौकीचे परचाके गायकवाड,तितरमारे व जुमनाके हे घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करून मूल येथे पाठविण्यात आले आहेत.
या दुर्घटनेमुळे गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत शेतक—यांच्या कुटुंबीयाांना शासनाने आर्थीक मदत करावी व शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    ” मृतकांच्या वारसांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती सानुग्रह योजनेतून 4 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. रविंद्र होळी दिली आहे.