हळदी येथील शेतकऱ्यांचे नदीपात्रातील पाच कृषी विद्युत पंप चोरीला

68

मूल-  तालुक्यातील हळदी येथील शेतकऱ्यांच्या शेताततुन पाच कृषि पंपांची  चोरीला गेल्याची दोनदिवसांपुर्वी रात्रीच्या वेळेस घटना  मध्यरात्री घडली आहे.याबाबत शेतकरी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.नेहमी प्रमाणे शेतातील कामे आटोपून सायंकाळी घराकडे गेले असता. मध्यरात्रीच्या सुमारास शेतात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कृषी विद्युत पंप लंपास केला. दुसऱ्या दिवशी शेताकडे गेले असता  पंप चोरीस गेल्याचे दिसून आले.कर्जाच्या ओझ्याखाली जीवन जगत असलेल्या शेतकऱ्यांचे नदीपात्रातील पाच कृषी विद्युत पंप चोरीलागेल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले असुन परिसरात विद्युत मोटर पंप चोरणारी टोळी सक्रिय असावी. असासंशय व्यक्त केल्या जात आहे.या आधीही अशा घटना घडल्या परंतु त्याचा शोध लागला नाही. यामूळे पुन्हा चोरट्याचे धाडस वाढल्याने दोन
दिवसांपुर्वी रात्रीच्या वेळेस हळदी येथील नामदेव गावतुरे, महेश मुमडवार, रुपचंद चलाख, निलकंठ चलाख आणि
बंडु कोतकोंडावार या पाच शेतकऱ्यांचे उमा नदी पाञामधील शेतीला पाणी पुरविण्यासाठी वापरल्या जाणारे पाच
विद्युत पंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुमारे एक लाख रुपयांपेक्षा अधिक
किमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. नदीकाठावर मोटर पंप घेऊन अनेक शेतकऱ्यांनी पाडपलाडन करून शेतीला
पाणी नेले. खरिपातील याच पाण्याद्वारे धानाचे उत्पन्नही घेतले. खरीप हंगाम संपला. रब्बी हंगामाचे नियोजन सुरु
असताना चोरट्यांनी विद्युत पंप चोरण्याचा धडाकाच लावला आहे. मोटर पंप चोरुन नेण्याच्या घटना सातत्याने घडत
आहेत. यामुळे शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. नवीन विद्युत पंप बसविण्याशिंवाय
पर्याय राहिला नाही तर, पुन्हा विद्युत पंप चोरला जाणार नाही याचीही खात्री राहिली नाही. विद्युत पंप चोरीच्या
घटनेने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

‘पोलिस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात येते मात्र पुढे कोणताही शोध लागत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.
अशातच गुन्हेगाराला शिक्षा केव्हा ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतातील विद्युत पंप
बसविण्यासाठी 50 हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. विद्युत पंप चोरीला गेल्यानंतर शेतकऱयांना मानसिक व आर्थिक
शवक नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.

संकटाचा सामना करीत शेतकरी उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यातही हंगामी पिकांचे
उत्पादन घेण्यावर मर देण्यात आला असताना प तातातील शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाला सामोरे जावे
लागत आहे. खरीप हंगामानंतर रब्बी हंगामाचे करीत असताना हळदी गावान्ना, तुमगाव म गावातील तब्बल
पाच कृषिपंप हे चोरीला गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तसेच मुल गडचिरोली महामार्गावर , टेकाडी, चांदली,
खेडी या गावातील शेतकऱयांनी रानटी डुकराचा बंदोबस्त करण्यासाठी बँटरीवरील ताराचे कुंपण शेतीच्या
समोवताल लावले होते. त्यावरील बँटरीही चोरांनी लंपास केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तीन दिवसांपूर्वी गडचिरोली महा मार्गावर चिमढा हा [लावर पाच युवक रात्रीच्या वेळेला गप्पा करीत असताना
पुलाला णाय न असलेल्या शेतकऱ्यांनी त्या अज्ञात विचारपुस केली असता शेती मध्ये चुरणा सुरु
असल्याचे खोटे सांगुन वेळ मारुन नेली त्यामुळे हीच मंडळी मोटार पंप चोरी करणारी असावी असा संशय व्यक्तकेल्या जात आहे. एकाच रात्री पाच कृषिपंपांची चोरी झाल्याने गावातील इतर शेतकऱ्यांचाही झोप उडाली आहे.शिवाय चोरट्यांना जेरबंद करावे व भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाने यंत्रणा
राबवण्याची मागणी नामदेव वत लाक नीलकंठ चलाख, सुनील कोतकोडावार, रुपचंद चलाख, ला मडवार या
अन्यायग्रस्त शेतकऱयांनी पोलिस केली आहे. असून शेतातील मोटरपंप चोरी करणाऱ्या शोध
घेणे पोलिसांसमोर आव्हान उभे आहे. अडचणीच्या प्रसंगी हजारो रुपयांचे मोटारपंप सध्याच्या यी
परीस्थिंतीमध्ये विकत आणायचे तरी कसे असा सवाल शेतकरी बांधवांनी केला असून पोलिसांनी मोटार पंप
चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

एका शेतकऱ्यांच्या शेताततुन विद्युत पंप चोरीला गेल्याची घटना दि.२५ च्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत शेतकरी बलभीम शिवराम क्षिरसागर (माळी) यांनी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
लोहारा येथील बलभीम क्षिरसागर यांची लोहारा शिवारातील लोहारा ते जेवळी जाणाऱ्या रस्त्यावर जमीन सर्वे नंबर १०८/१/१ मध्ये शेतजमीन आहे. या शेतात एक विहीर असून या विहीरीवर त्यांनी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी ५ एच पी ची विद्युत पंप (मोटार) बसवली होती.नेहमी प्रमाणे शेतातील कामे आटोपून सायंकाळी घराकडे गेले असता. मध्यरात्रीच्या सुमारास शेतात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंप लंपास केला.बलभीम क्षिरसागर दुसऱ्या दिवशी शेताकडे गेले असता विद्युत पंप चोरीस गेल्याचे दिसून आले.याबाबत त्यांनी लोहारा पोलीस निरीक्षक यांच्याकडे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी करीत अर्ज केला आहे.