संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या ३० मे पर्यंत आधार कार्ड व मोबाइल क्रमांक तलाठी यांच्याकडे

63

निराधारांना अनुदान मिळणार आता ‘डीबीटी’मार्फत

चंद्रपूर : व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठरावीक मानधन दिले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र, थेट डीबीटीमार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.
शासनाकडून निराधार
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व
लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकांत खेटे मारावे लागत होते. मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित
कागदपत्रे द्या, अन्यथा अनुदानापासून वंचित
■ संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी येत्या ३० मेपर्यंत आधार कार्ड व मोबाइल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मुदतीत आधार कार्ड व मोबाइल क्रमांक न देणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते.
ही द्यावी लागणार कागदपत्रे
■ निराधारांना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी मानधन दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरक लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे.
यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल नंबर आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.
करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना
आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.