तोहगाव येथील घटना शोधमोहीम सुरू नदीत 3 बालके बुडाली

55

गोंडपिपरी तालुक्यातील तोहंगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेल्या तीन शाळकरी मुले पाण्यात बुडाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवार (ता. 8) जुलैला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. प्रतिक नेताजी जुनघरे (11), निर्दोष रायपुरे ( 10 ), सोनल रंगारी (9) अशी बुडालेल्या बालकांची नावे आहेत. प्रतिक, निर्दोष, सोनल आणि आरुष चांदेकर हे चौघेही शाळा संपल्यावर मासे पकडायला वर्धा नदीवर गेले होते. प्रतिक, निर्दोष, सोनल तिघेही पाण्यात उतरले, मात्र त्यांना पाणी किती खोल आहे यांचा अंदाज न आल्याने ते बुडाले. हे बाहेर उभ्या असलेल्या चांदेकर नावाच्या मुलाच्या लक्षात येताच त्याने गावात जावून गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनतर संपूर्ण गाव वर्धा नदीजवळ जमा झाले. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली
गावातीलच एका महिलेने मुलांन बुडताना पाहिल्याने युद्धस्तरावर शोध मोहीम सुरू असून घटनास्थळी लाठ व कोठारी पोलिस आलेत. मात्र अद्यापही मुलांचा शोध लागलेला नाही.